मुंबई – राज्यात २०२१-२२ मध्ये राज्यात तब्बल १८४ साखर कारखाने (Sugar factory) सुरु झाले आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९१ खासगी व ९३ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा (Sugar factory)समावेश आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४३ साखर कारखाने सुरु झाले आहे. आतापर्यंत जवळपास 312.68 लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे.
राज्यात ११ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल 292.12 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता राज्याचा सरासरी साखर उतारा 9.34 टक्के इतका आहे.
तर राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल 79.32 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 84.44 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर उतारा 10.65 टक्के आहे.
- चांगली बातमी – देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची नोंद
- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी ‘अशी’ करा घरबसल्या नोंदणी!
- मराठवाड्यात ओमायक्रॉनचा शिरकाव; ‘या’ जिल्ह्यात आढळला पहिला रुग्ण
- राज्यात गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये एकूण १८४ साखर कारखाने सुरू; ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु
- हिवाळ्यात सुंदर ओठ ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत घरगुती उपाय
- महसूल विभागांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागरिकांना सुविधा द्याव्यात!