मुंबई – महाराष्ट्रात (Maharashtra) गळती हंगाम २०२१-२२ मध्ये १६ जानेवारी २०२२ पर्यंत तब्बल १९२ साखर कारखाने (Sugar factory) उसाचे गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९७ खासगी व ९५ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात १९२ साखर कारखान्यांकडून ६००.३३ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात १६ जानेवारी २०२२ पर्यंत तब्बल ५९५.३३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा ९.९१ टक्के इतका आहे.
तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ४५ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल १४१ लाख ४७ हजार लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये १२६ लाख ५५ हजार लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे.
ऊस गाळपासह साखर उत्पादनात (Sugar production) कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. कोल्हापूरजिल्ह्यामध्ये तब्बल १४४.३५ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १६२.७१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. कोल्हापूर सरासरी साखर उतारा ११.२७ टक्के इतका आहे.
महत्वाच्या बातम्या –
- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी – पीएम किसान योजनेसाठी ‘हे’ कागदपत्र असेल तरच मिळणार पैसे…
- राज्यात पुन्हा पाऊस! ‘या’ जिल्ह्यांमध्ये दोन दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता
- सावधान! राज्यातील ‘या’ भागांमध्ये दोन दिवस पावसासह गारपीट होण्याची शक्यता
- भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल !
- हवामान विभागाचा अंदाज: राज्यातील ‘या’ भागांमध्ये दोन दिवस गारपीट होण्याची शक्यता
- ऊस गाळपासह साखर उत्पादनात ‘हा’ जिल्हा महाराष्ट्रात आघाडीवर