देशाला कृषिप्रधान करणाऱ्या शेतीव्यवस्थेला प्रगतशील करण्यासाठी बी.बी.एफ. पेरणी (Sowing) पद्धत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ याचा सामना शेतकरी करत असतात आणि याचाच परिणाम पिकांवर होऊन उत्पादनात घट होते. अशावेळी पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षितपणे निचरा करणे, उत्पादन वाढीसाठी रुंद वरंबा सरी लागवड पद्धत फायदेशीर ठरते.
बी.बी.एफ. पेरणी पद्धत म्हणजे काय ?
हे ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र असून रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे एकाच वेळी केली जातात. यामध्ये दोन फाळ आणि पेरणीचे फण यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते. तसेच सऱ्यांची रुंदीही कमी जास्त करता येते. उदा. वरंब्यावर सोयाबीन पिकाच्या ३ ते ४ ओळी ३० सें.मी. किंवा ४५ सें.मी. अंतरावर ३ ओळी घेता येतात. फाळामध्ये तयार होणाऱ्या सऱ्यांची रुंदी ३० ते ४५ सें.मी. गरजेनुसार ठेवता येते. कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या दृष्टीने बीबीएफ पद्धत अतिशय उपयुक्त आहे. तसेच अधिक व सततच्या पावसामध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने बीबीएफ पद्धत उपयोगी आहे. या पद्धतीमुळे सर्वसाधारणपणे २० ते २७ टक्क्यांपर्यंत जलसंधारण तर २५ टक्के उत्पादनात वाढ दिसून आली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- हवामान विभागाचा अंदाज: राज्यातील ‘या’ भागांमध्ये दोन दिवस गारपीट होण्याची शक्यता
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका कमी होणार
- चांगली बातमी – राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; दिवसभरात आढळले ‘इतके’ रुग्ण
- तूर डाळीचे दर शंभरी गाठणार
- ‘चंदन शेती’ करोडोचे उत्पन्न देणारे पीक? सत्य कि अफवा !
- तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम करताना शेतकऱ्यांच्या समस्या दुर्लक्षित नको – सुनिल केदार
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात २९ साखर कारखाने सुरु