‘या’ जिल्ह्यात १०० लाख क्विंटलपर्यंत साखर उत्पादन

मुंबई – राज्यात गळती हंगाम २०२१-२२ मध्ये १ जानेवारी २०२२  पर्यंत तब्बल १८९ साखर कारखाने (Sugar factory) ऊस गाळप सुरू. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९४ खासगी व ९५ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा (Sugar factory) समावेश आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये ४४ साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल ११४ लाख ७७ हजार लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये १०० लाख ७४  हजार लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील  साखर उतारा ८.७८ टक्के आहे.

आतापर्यंत राज्यात १८८ साखर कारखान्यांकडून ४७९.८५ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे. राज्यात १ जानेवारी २०२२  पर्यंत तब्बल ४६५.२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे,  तर  यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता राज्याचा सरासरी साखर उतारा ९.६९ टक्के इतका आहे.

महत्वाच्या बातम्या –