सकाळी उठल्यानंतर मीठ पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे

आजच्या धवपळीच्या जगात अनेक आजारांचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे. त्यमुळे प्रत्येक जण तंदरूस्त राहण्यासाठी धडपड करत असतो. अशा अनेक अजारांपासून लांब राहण्यासाठी नियमीत मिठाच्या पाण्याचे सेवन करावे. पण आजाराचे प्रमाण जास्त असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मिठपाण्यामुळे फक्त  मधुमेहच नाही तर अनेक जीवघेण्या आजरापासून आपला बचाव होतो. यामुळे मधुमेह आणि स्थूलपणा कमी होण्यास मदत होत असते. तसेच विविध जीवघेण्या आजारावर ही मीठ पाणी उपयुक्त ठरत आहे.

  • वजन कमी करणे – कोमट पाण्यातून काळे मीठ प्याल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. यामुळे स्थूलपणा कमी होतो. कोलेस्ट्रोल देखील कमी करण्यास मदत करते. मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.
  • झोपेसाठी उपयुक्त – नियमित मीठ पाण्याचे सेवन केल्यास झोपेच्या समस्या कमी होतात. त्यामुळे अनिद्रेचा त्रास पूर्णपणे बरा होतो.
  • हाडे आणि स्नायू मजबूत करते – काळे मीठ आणि कोमट पाण्यात मिसळून रोज प्यायल्यास शरीरातील पोटॅशिअम कमी होते. त्यामुळे स्नायू मजबूत होऊन चांगले आरोग्य लाभते. वाढत्या वयोमानानुसार शरीरातील खनिजे आणि कॅल्शिअमचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे हाडे कमकुवत होऊन दुखू लागतात. रोज नियमित सकाळी मीठ पाणी पिल्याने हाडांना खनिजांची पूर्तता होऊन हाडे मजबूत होतात.
  • मधुमेह आणि स्थूलपणा कमी होतो – मीठ पाण्यामुळे आपल्या शरीरातील स्थूलपणा व मधुमेह  कमी करण्यास  मदत होते. फक्त मधुमेहच नाही तर अनेक जीवघेण्या आजरापासून आपला बचाव होतो. मीठ पाण्याने वजन कमी होवून मधुमेह कमी होण्यास मदत होते.
  • त्वचा उजळू लागते – मीठ पाणी पिल्यास त्वचेच्या समस्या दूर होतात. या पाण्याने त्वचेवरील पुटकुळ्या, मुरूमे, काळे डाग अशा समस्या दूर होतात. मिठाच्या पाण्यात क्रेमिया असल्यामुळे त्वचा रोगांशी लढून त्वचा उजळण्यास मदत होते.
  • शरीरातील पचन संस्था मजबूत करते – मीठ पाण्यामुळे तोंडातील लाळ निर्मिती करणार्‍या ग्रंथी अधिक कार्यरत होत असतात. त्यामुळे एन्झाईम्स (नैसर्गिक मीठ),  हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड आणि प्रथिने पोटातील अन्न पचवण्याचे कार्य करत असतात. त्याशिवाय पोटातील यकृत, आतडे यांच्यामध्ये अन्न पचवण्यास एन्झाईम्स निर्माण करत असते.

महत्वाच्या बातम्या –