यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांना न्याय मिळाला; शेतकरी बांधवांना भरपाई अदा

अमरावती – अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदार संघातील वाघोली येथील शेतकऱ्यांना पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या प्रयत्नांनी न्याय मिळाला. रतन इंडिया पावर प्लांटच्या धुळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अखेरीस नुकसान भरपाई देण्यात आली. अमरावती तालुक्यातील नांदगाव पेठ जवळील वाघोली येथील शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून त्रस्त होते. रतन इंडिया पावर प्लांट मुळे या शेतकऱ्यांच्या शेतात धुळीचे … Read more

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे शेतकरी आत्महत्या

कर्जबाजारी आणि सततच्या नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्यानं आपली जीवनयात्रा संपवली आहे. भास्कर राजणकर असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोक नगर येथील ही घटना आहे.यावर्षी कशीबशी आर्थिक तडजोड करून पाच एकर शेतात सोयाबीन आणि कपाशीची लागवड केली होती. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतातलं पीक करपलं. हा धक्का सहन न झाल्यानं … Read more