जीवसत्व आपल्या शरीरातील महत्त्वाचा घटक असतात. शरीरात जीवनसत्त्वाची कमतरता आढळल्यास विविध आजार होण्याचा धोका अधिक असतो. तुमच्या आहारात (Diet) अ जीवनसत्त्वाची कमतरता आहे का ? तुम्ही गाजर टोमॅटो, पालेभाज्या कमी खाता का? असं असेल तर हे तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं.नुकत्याच हार्वड युनिवर्सिटीनं केलेल्या एका रिसर्चनुसार अ जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर टीबी होण्याची शक्यता दहापट वाढते.
यासोबत डोळ्याचा समस्या आणि इतर आजारही तुम्हाला होण्याचा धोका अधिक असतो. अ जीवनसत्त्व तुमची प्रतिकारक शक्ती वाढवतं. एका अहवालाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा आणि क्षयरोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात.
साधारणपणे पिवळ्या, नारिंगी रंगाच्या सर्व पदार्थातून अ जीवनसत्त्व मिळते. कॉड माशाचे तेल, लिवर, अंडी या प्राणिज स्रोतांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’चे प्रमाण सर्वात जास्त असते. शिवाय दूध, दुधाचे पदार्थ, सर्व नारिंगी-पिवळ्या भाज्या जसे आंबा, गाजर, टोमॅटो, लाल भोपळा, आंबा, पपई, सर्व हिरव्या पालेभाज्या यातूनही अ जीवनसत्त्व मिळतं. त्यामुळे रोजच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या –
- चिंता वाढली! राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ कोरोनाबाधितांची नोंद
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
- राज्यातील १८८ साखर कारखान्यांकडून तब्बल ४३१.०६ लाख टन उसाचे गाळप
- राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्याचा आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा
- हवामान विभागाचा मोठा अंदाज – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार
- धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शासन सकारात्मक – अजित पवार