‘या’ तालुक्यात वृक्ष लागवडीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करावी – दत्तात्रय भरणे

मुंबई – नंदुरबार येथील मौजे भगदरी, मौजे भांगरापाणी, मौजे काठी व जौजे मुलगी, शहादा या गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड करण्यात यावी. असे निर्देश मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. नंदुरबार येथील अक्कलकुवा तालुक्यातील वृक्ष लागवडीच्या कामांसंदर्भात बैठकीचे आयोजन मंत्रालयात करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. … Read more

‘हे’ केले तरच मूग लागवडीचा होणार फायदा, जाणून घ्या

दुष्काळाशी दोन हात करतानाच महाराष्ट्रातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीलाही लागला आहे. खरीप हंगामात जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यास मुग पिकाची लागवड करून कमी कालावधीत आर्थिक समाधान मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण होणार की फोल ठरणार, हे वरुणराजा ठरविणार आहे. हमखास पाऊसमान असो की अवर्षणप्रवण प्रदेशातील मध्यम जमीन किंवा भारी कसदार काळ्या जमिनीत … Read more

तुती लागवडीने शेतकऱ्यांना मदतीचा हात

उस्मानाबाद जिल्ह्यात कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या रेशीम शेतीकडे शेतकरी वळत आहेत. अनेक तरूण शेतकऱ्यांनीही या शेतीचा मार्ग अनुसरला आहे. ऊस उत्पादक शेतकरीही रेशीम शेतीकडे वळतायत. उस्मानाबादमधला कळंब तालुका दुष्काळी भाग. मात्र तालुक्याने रेशीम शेतीच्या माध्यमातून यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. ३७१ शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष रेशीम उत्पादन सुरू झालं आहे. जवळपास २०हून अधिक गावं रेशीमग्राम झाली … Read more